Time-प्लीज
(भाग २)
कधी कधी खरंच विचार
केला ना की
प्रश्न पडतो,स्वतःच्या
मनानुसार खरंच जगायला
मिळतं का ?
एकत्र आल्यावर जबाबदा-या
नव्यानं कळतात का ? आपल्यात
असलेल्या क्षमतेची ओळख पुन्हा
नव्याने कळते का
? पुस्तकांत वर्णिलेलं आयुष्य ख-या आयुष्यात
नसतंच.. ख-या
आयुष्यात जगताना येणारे अनुभवच
खरे असतात.
कधी सोबत म्हणून,
तर कधी गरज
म्हणून, तर कधी
नवा अनुभव घ्यायचा
म्हणून सोबत हवी
असते. त्यातच मजा
अनुभवायची असते,स्वतः
च सुख शोधण्याचा प्रवास असतो
तो.. आयुष्यावर पुन्हा
एकदा नव्यानं प्रेम
करण्यासाठीचा प्रवास.. अशा वेळी
‘सोबत’ असली की
नात्यांचे दोर आणखीनच
‘घट्ट’ होतात.
वैदेहीला सोबत माझीही
आवडत होतीच, पण
तिला वेळ नव्हताच.
लग्नाआधी Good Morning चे नियमित
Message करणारी ती.. आता
साधं तिचं माझ्याकडे बघुन हसणं
देखील दुर्मिळ झालं
होतं.
अभ्यासात, तिच्या कामात ती
हुशार होतीच. यश
तिला मिळतंच होतं;
पण
घर सांभाळण्यात तिचा
थोडा हातभारही मला
गरजेचा वाटला होता.
तिनं अगदीच काही
नाही, निदान माझं कौतुक
करावं इतकीच माझी माफक
अपेक्षा होती. तिला नेमकं
काय करायचं होतं
? आपल्याला
जे आवडतं ते
करावं की स्पर्धेच्या
युगात आवडीला मुरड
घालून जे भेटेल
ते मिळवत यश
मिळवावं हे निवडणं
कठीण झालं होतं.
विचारांना प्रवाही नाही केलं
तर त्याचं डबकं साचतं.
अगदीच काही आमची
जोडी इतकी परस्परविरोधी नव्हती की मी
अडाणी, दारू पिऊन
मारझोड करणारा वगैरे.. मला
इतकंच वाटत होतं
की तिने जे
तिला आवडतं ते
करावं आणि गतिशील
व्हावं.
लग्नाआधी मला नुकताच
जॉब मिळाला होता.
प्रोबेशन मध्ये असताना मित्र
म्हणायचे अरे सुट्टी
काही मिळणार नाही.
तरीही आम्ही भेटायचो.
ती सुद्धा लांब
ऑफिस ला होती
तेव्हा वेळ काढून
यायची.. किती आनंदाचे
क्षण होते ते..
आता साधं सोबत जेवायला
सुद्धा वेळ नसतो
तिला.. ती येते
तेव्हा मी झोपलेला
असतो अन् मी
जातो तेव्हा ती
झोपलेली.
स्त्री संवेदनशील असते आणि
पुरुष निर्णयक्षम ! पण
नेमकं संवेदनशीलतेचाही इथे
उपयोग नव्हता आणि
माझ्या कुठल्याही घेतलेल्या निर्णयाचासुद्धा.. संबंधांना संशयात बघायचं
सामर्थ्य नेमकं येतं तरी
कुठून ? प्रश्न खरे येथेच
निर्माण होतात.
तिला मला एवढीच
जाणीव करून द्यायची
होती की ,मान्य
आहे प्रत्येकाची विचारशक्ती
वेगळी,आवड वेगळी,अपेक्षा वेगळी आणि
व्यक्त होण्याचे मार्ग देखील
वेगळे, पण एक
तरी गोष्ट असेलच
ना ?
“जी
तुला माझ्यात आणि
मला तुझ्यात गुंतवून
ठेवत असेल..?”
“बराच वेळ गेलाय
पण मी चुकलीय
हे त्याला कसं
सांगू ? तो तर
मला नेहमीच सांभाळून
घेत आलाय मग
मी व्यक्त कसं
होऊ ? लग्नाला दहा
वर्ष झाली, करिअरपायी
मी मूल नको
असं त्याला म्हंटलं
आता वाटतंय की बरं
झालं असतं मूल
असतं तर त्याच्याजवळ
जाऊन निदान मनमोकळेपणाने
मनसोक्त रडता तरी
आलं असतं.”
पैसा ,सौंदर्य इ. ने नाही तर प्रेम ‘विश्वासानेच’ निर्माण होतं, हे पुन्हा नव्याने
अनुभवायचं होतं. मासा पाण्यात पोहतो, त्याला पोहण्याचे क्लास नाही लावावे लागत; सुगरण
कुठेही डिग्री घेत नाही, तरी उत्कृष्ट घर बांधते; कोकिळा कुठेही गाण्याच्या क्लासला
नाही जात, तरी उत्तम गाते. अगदी तसंच जबरदस्ती नाही, शिकवूनही नाही, तर आतूनच यावं
लागतं तरच ते टिकतं ‘असं’ प्रेम मला पुन्हा हवं होतं; तेही वैदेहीकडूनच!!
मनावर वेळ न देण्याची
'धूळ' साचली होती इतकंच..!
अगदीच पाण्याचे सर्व थेंब गळून
ओंजळ रिकामी व्हावी,
इतकं शुष्क नातं झालं
नव्हतंच. तिलाही ते जाणवत
होतं आणि मलाही
की एकमेकांशिवाय आमचं
जीवन अपूर्णच आहे.
साचलेली धूळ तिने
अलगद बाजूला सारून
माझ्या पुन्हा जवळ
यावं यासाठी तिला
एवढंच सांगायचं होतं
की..
''स्वतःच्या
Limitations आणि स्वतः साठीच्या Limitations समजल्या
की आपण सहज म्हणू
शकतो.. Don’t Worry ! Be
Happy..!!
क्रमश: