Wednesday, 31 May 2017

Time-प्लीज..


 Time-प्लीज

 (भाग २) 





कधी कधी खरंच  विचार केला ना की प्रश्न पडतो,स्वतःच्या मनानुसार खरंच जगायला मिळतं का ?
एकत्र आल्यावर जबाबदा-या नव्यानं कळतात का ? आपल्यात असलेल्या क्षमतेची ओळख पुन्हा नव्याने कळते का ? पुस्तकांत वर्णिलेलं आयुष्य -या आयुष्यात नसतंच.. -या आयुष्यात जगताना येणारे अनुभवच खरे असतात.
 
कधी सोबत म्हणून, तर कधी गरज म्हणून, तर कधी नवा अनुभव घ्यायचा म्हणून सोबत हवी असते. त्यातच मजा अनुभवायची असते,स्वतः च सुख शोधण्याचा प्रवास असतो तो.. आयुष्यावर पुन्हा एकदा नव्यानं प्रेम करण्यासाठीचा प्रवास.. अशा वेळीसोबत’ असली की नात्यांचे दोर आणखीनचघट्ट’ होतात.

वैदेहीला सोबत माझीही आवडत होतीच, पण तिला वेळ नव्हताच. लग्नाआधी Good Morning चे नियमित Message करणारी ती.. आता साधं तिचं माझ्याकडे बघुन हसणं देखील दुर्मिळ झालं होतं.  

अभ्यासात, तिच्या कामात ती हुशार होतीच. यश तिला मिळतंच होतं;  पण घर सांभाळण्यात तिचा थोडा हातभारही मला गरजेचा वाटला  होता. तिनं अगदीच काही नाही, निदान  माझं कौतुक करावं इतकीच माझी माफक अपेक्षा होती. तिला नेमकं काय करायचं होतंआपल्याला जे आवडतं ते करावं की स्पर्धेच्या युगात आवडीला मुरड घालून जे भेटेल ते मिळवत यश मिळवावं हे निवडणं कठीण झालं होतं. विचारांना प्रवाही नाही केलं तर त्याचं  डबकं साचतं. अगदीच काही आमची जोडी इतकी परस्परविरोधी नव्हती की मी अडाणी, दारू पिऊन मारझोड करणारा वगैरे.. मला इतकंच वाटत होतं की तिने जे तिला आवडतं ते करावं आणि गतिशील व्हावं.

लग्नाआधी मला नुकताच जॉब मिळाला होता. प्रोबेशन मध्ये असताना मित्र म्हणायचे अरे सुट्टी काही मिळणार नाही. तरीही आम्ही भेटायचो. ती सुद्धा लांब ऑफिस ला होती तेव्हा वेळ काढून यायची.. किती आनंदाचे क्षण होते ते.. आता साधं सोबत जेवायला सुद्धा वेळ नसतो तिला.. ती येते तेव्हा मी झोपलेला असतो अन् मी जातो तेव्हा ती झोपलेली

स्त्री संवेदनशील असते आणि पुरुष निर्णयक्षम ! पण नेमकं संवेदनशीलतेचाही इथे उपयोग नव्हता आणि माझ्या कुठल्याही घेतलेल्या  निर्णयाचासुद्धा.. संबंधांना संशयात बघायचं सामर्थ्य नेमकं येतं तरी कुठून ? प्रश्न खरे येथेच निर्माण होतात.

तिला मला एवढीच जाणीव करून द्यायची होती की ,मान्य आहे प्रत्येकाची विचारशक्ती वेगळी,आवड वेगळी,अपेक्षा वेगळी आणि व्यक्त होण्याचे मार्ग देखील वेगळे, पण एक तरी गोष्ट असेलच ना ?  

जी तुला माझ्यात आणि मला तुझ्यात गुंतवून ठेवत असेल..?”

“बराच वेळ गेलाय पण मी चुकलीय हे त्याला कसं सांगू ? तो तर मला नेहमीच सांभाळून घेत आलाय मग मी व्यक्त कसं होऊ ? लग्नाला दहा वर्ष झाली, करिअरपायी मी मूल नको असं त्याला म्हंटलं आता वाटतंय की बरं झालं असतं मूल असतं तर त्याच्याजवळ जाऊन निदान मनमोकळेपणाने मनसोक्त रडता तरी आलं असतं.”

पैसा ,सौंदर्य इ. ने नाही तर प्रेम ‘विश्वासानेच’ निर्माण होतं, हे पुन्हा नव्याने अनुभवायचं होतं. मासा पाण्यात पोहतो, त्याला पोहण्याचे क्लास नाही लावावे लागत; सुगरण कुठेही डिग्री घेत नाही, तरी उत्कृष्ट घर बांधते; कोकिळा कुठेही गाण्याच्या क्लासला नाही जात, तरी उत्तम गाते. अगदी तसंच जबरदस्ती नाही, शिकवूनही नाही, तर आतूनच यावं लागतं तरच ते टिकतं ‘असं’ प्रेम मला पुन्हा हवं होतं; तेही वैदेहीकडूनच!!

मनावर वेळ न देण्याची 'धूळ' साचली होती इतकंच..!

अगदीच पाण्याचे सर्व  थेंब गळून ओंजळ रिकामी व्हावी, इतकं शुष्क  नातं झालं नव्हतंच. तिलाही ते जाणवत होतं आणि मलाही की एकमेकांशिवाय आमचं जीवन अपूर्णच आहे. साचलेली धूळ तिने अलगद बाजूला सारून माझ्या पुन्हा  जवळ यावं यासाठी तिला एवढंच सांगायचं होतं की.. 

''स्वतःच्या Limitations आणि स्वतः साठीच्या Limitations समजल्या की आपण सहज म्हणू शकतो.. Don’t Worry ! Be Happy..!!


क्रमश:

Tuesday, 30 May 2017

Time-प्लीज..


आहाहा.. काय ते लोभसवाणं रूपं होतं तिचं !! जणु पाऊस येताच मयूरपक्ष्यानं नृत्य करावं असं.. बाह्यशृंगार,सजावट नव्हतीच..पण प्रात:काळी तिला पाहिलं आणि तिच्या डोळ्यांत जाणवलं - 'विलक्षण कारुण्य.'
'' एक तेरे अदा कि, रौदाद हो गए है हम, मस्ती में एक हसीं को, खुदा कह गए  है हम ''
कुठेतरी ऐकलेली शायरी जणु तिच्यासाठीच बनली असावी असंच मला वाटलं
मी काहीच बोलता फक्त बघुन हसलो.

भेटीगाठी तर नियमित होत होत्याच पण आज नेमकं कुठून बोलणं सुरु करावं हेच समजत नव्हतंमग शेवटी मीच काहीतरी विचारायचं म्हणून म्हंटलं,कसं चाललंय जॉबचं ? कधी वर, कधी खाली कधी मोबाईलमध्ये डोकं खुपसत, कधी ओढणीशी खेळत.. असं कितीही गुंतलेलं असलं तरी तिची नजर माझ्याकडेच स्थिरावली होती. एकमेकांना सारं काही ठाऊक होतं आणि जाणवलं ही होतं. फारसा विलंब करता फक्त स्वीकारायचं होतं.. कधीही 'अस्वीकार' करण्याचं बंधन..

आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस होता. मला कंपनीने मॅनेजिंग डिरेक्टर म्हणुन बढती दिली होती, त्याची पार्टी होती. समाजातील प्रतिष्ठीत  व्यक्ती,मित्रमंडळी, नातेवाईक सर्व हजर होते. आमच्या 'सौ'नादेखील  रीतसर आमंत्रण होते आणि मी सुद्धा दहावेळा फोन केला होता, “आज तुला यायचं आहे हा..”.

ती आलीच नाही , फोनही लागत नव्हता. मी मनाची समजूत घातली, ती कामात असेल म्हणून जमलं नसेल कदाचित. सगळ्यांना ती आजारी आहे असं सांगून वेळ मारून नेली खरी ; पण मला तिचा प्रचंड राग आला होता. कारणहे असं’ करण्याची तिची पहिलीच वेळ नव्हती. खूपदा असं झालं होतं आणि कळस म्हणजे  नुकत्याच झालेल्या आमच्या लग्नाच्या 'दहाव्या' वाढदिवसाला  देखील तिने असंच केलं होतं.

सर्व आटोपून  मी घरी तिच्यासाठी जेवण घेऊन गेलो. आणि बघतो तर काय,ही खुशाल झोपली होती. वाटलं गदागदा हलवून तिला उठवावं आणि जाब विचारावा की निदान मला अभिनंदन तरी करायला यावं असं वाटलं नाही का तुला ? तिने माझ्यासाठी चिट्ठी लिहिली होती.. 'सॉरी डिअर, मला यायला उशीर झाला. मी दमली होती म्हणून नाही आले तुझं खूप खूप अभिनंदन.. Good  Night.. ‘

एकदा येण्याची चूक मलाही मान्य झाली असती.पण चिठ्ठीचा हा उपायनेहमीचाच’ असल्याने मला त्याचं फारसं काहीच वाटलं नाही. मी हा असाच.. नातेवाईक मला बायकोच्या आधीन गेलेला प्राणीदेखील म्हणतात.

मी भूषण ! BE झालेला मध्यमवर्गीय कुटुंबातला, घरात दोघे भावंडं आणि आईबाबांसोबत राहणारा, एका MNC  मध्ये काम करणारा, मला फारसं भांडता येत नाही हाच मुद्धा माझ्या आईलासुद्धा पटणारा..

वैदेही! माझी पत्नी, Bsc.IT झालेली, कुटुंबातील  एकुलती एक , सतत काहीतरी नवीन करायची आवड असलेली, जिद्दी, महत्वाकांक्षी ,कामातच मन रंगवणारी एक स्वछंदी मुलगी..  आमचं लग्न आधीअरेंज’ झालं मग आम्ही एकमेकांच्याप्रेमात’ पडलो.

ती झोपली होती; बाजूला मी शांत उभा होतो. आज अशी वेळ आली होती की एकत्र राहत  असलो तरी एकाच घरात दोन अनोळखी राहत असल्याची जाणीव मला झाली.

वैदेही.. तिचं स्वतःच असं वेगळं विश्व जरी असलं तरी त्यात मीदेखील होतो.. तिला वेळ देणं फारसं जमत नव्हतं. त्या दिवशीच्या प्रसंगांनंतर एकदा तिचाच मॅसेज आला.. आज वेळ आहे का तुला ? मरीन ड्राईव्ह ला भेटूयात का ? मी काहीही विचार करता हो म्हणालो. आज ती वेळेआधी आली होती, मग इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्या.. ती काहीच बोलत नव्हती.. मी विचारलं काही हवंय का ? काही सांगायचं आहे का ?

ती एवढंच म्हणाली.. ''माझं मुकेपण  जर तुला समजलं नसेल तर माझे शब्दही तुला कळणार नाहीत..!!''

मला आठवलं..
 ''जब तुलू आफताब होता है, गम के सागर उछाल देता हूँ,
 ताझकीरा जब वफा का होता है, मैं तुम्हारी मिसाल देता हूँ ''


क्रमश:







Time-प्लीज

 (भाग १)