Thursday, 18 February 2016

जल स्थल अंबर दे ललकार ! शिवछत्रपतींचा जयजयकार !!





काळाच्या पेठा-यात दडलेली रत्ने ही निसर्गाने मानवाला दिलेली देणगी आहे. महाराष्ट्राच्या मातीतील 'नर'रत्नांची सर्वांनीच दखल घेतली आहे. अभंगापासुन औद्योगिकतेच्या क्षेत्रात, पाडगावकरांच्या कवितेपासून रंगभूमीच्या कलाकारांपर्यंत... या नररत्नांमध्ये शोभुन दिसणारा शिरोमणी म्हणजे 'शिवाजी महाराज..'
आयुष्यभर जिवाशी खेळणारे एक 'अष्टपैलू' खेळाडू, दुर्जनांचा कर्दनकाळ स्वरुप 'वज्र', 
संतांच्या भुमीतील आधाररुपी वृक्ष आणि प्रेमळ जनतेच्या 'मनामनांत राज्य' करणारा ह्रदयसम्राट..
म्हणुनच तर शिवाजी महाराजांवरील ग्रंथसंपदा विपुल नसली तरी, 'शिवरायांविषयी माहीती नाही' असा एकही नाही.. हेच ह्या शिवचरीत्राचे मोठेपण आहे...





दिपस्तंभासारखी उभी आजही असे शिवशाही..
लोकशाही ही बनुन नाचते पुंजपतींची झुंडशाही..


पुन्हा घेऊनी संकल्प हाती, जेव्हा पूर्ण करू निरपेक्ष कष्ट..
तेव्हाच मिळतो हक्क म्हणाया....
  "महाराज...जय महाराष्ट्र..!"

No comments:

Post a Comment