Friday, 26 August 2016

‘’ जन्मना जायते जंतु: | संस्कारात् द्विज् उच्यते | ’’


  
 


    केवढासा तो जीव लोभसवाणा.. चेह-यावर समाधानाचं हसू आलेलं.. आईसमवेत शाळेतून घरी येताना आपल्याच मस्तीत रमलेला.. रस्त्यात जेव्हा पाहिलं तेव्हा थोडसं कुतूहल माझ्याही चेहऱ्यावर होतच म्हणा.. त्याच्या आईच्या चेहऱ्यावर जणू त्यांनी जगच जिंकलं असावं असं भासत होतं..
    निमित्त होत ते शाळेत होणाऱ्या गणितातील विशेष परीक्षेचं.. मुळात असल्या 'एखाद्या' विषयात प्राविण्य मिळवता येणाऱ्या अशा काही परीक्षा असतात हेच बऱ्याच जणांना ठाऊक नसतं ही गोष्ट वेगळीच.. असो ! चौकशीअंती समजलं की छोटू दुसरीला आहे.. घरची परिस्थिती छान आहे तशी.. मध्यमवर्गीयच.. तर होणाऱ्या परीक्षेसाठी शाळेतून पाठवण्यासाठी ५ जणांची निवड करण्यात आली आहे.. परीक्षेत प्रथम येणाऱ्यास १००००/-,व्दितीय येणाऱ्यास ५०००/-,तृतीय येणाऱ्यास ३०००/- रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे..
ह्याने न घरी विचारताच त्या परीक्षेसाठी स्वतःहुन नावं दिलेलं होतं (आजच त्या ५ विद्यार्थ्यांच्या पालकांना विध्यार्थ्यांना कुठे परीक्षेसाठी घेऊन जायचं आहे याकरिता बोलावलं होतं तेव्हा त्यांना हा ही परीक्षा देतोय हे समजलं..)
वर्गातून खाली उतरता उतरता तो आईला म्हणाला..
आई :मी खूप अभ्यास करेन,काही करेन..पण पहिलाच नंबर काढेन..
कौतुक आणि आश्चर्यमिश्रित चेहऱ्याने आईने विचारलं : ''का रे ? तू ही परीक्षा देत आहेस हीच मोठी गोष्ट आहे..''
छोटू : ''अगं ते पहिल्या क्रमांकाचं मिळणारं बक्षीस आणि बाबांचे थोडे पैसे त्यात टाकून आपण आपल्या घरात 'Refrigerator' घेऊयात ना.. म्हणजे जी भाजी खराब होते ना ती आपण त्यात ठेवू.. अन्नही वाया जाणार नाही.. आणि माझी 'कॅडबली'ही त्यातच ठेवता येईल..''

त्याच्या उत्तराने लहानपणी मनाला भावलेल्या काही ओळी अचानक नजरेसमोर तरळल्या..

 
‘’हमारे पीछे कोई आए ना आए
हमें ही तो पहले पहुँचना वहाँ हैं
जिन पर हैं चलना नई पीढ़ीयों को
उन ही रास्तों को बनाना हमें हैं I
जो भी साथ आए उन्हे साथ ले ले
अगर ना कोई साथ दे तो अकेले
सुलगा के खुद को मिटा ले अंधेरा


हमारी ही मुट्ठी में आकाश सारा
जब भी खुलेगी चमकेगा तारा II’’



परीक्षा होण्यास अजून अवकाश आहे.. यश मिळेल कि नाही हा नंतरचा भाग..
परंतु मिळालेल्या संस्कारात छोटू मात्र नक्कीच 'पास' झाला आहे.. 
यात मात्र काहीच शंका नाही..

Sunday, 21 August 2016

॥ कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥





 
वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम्,
देवकीपरमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥१

आतसीपुष्पसंकाशम्
हारनूपुरशोभितम्,
रत्नकण्कणकेयूरं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥२

कुटिलालकसंयुक्तं
पूर्णचंद्रनिभाननम्,
विलसत्कुण्डलधरं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥३

मंदारगन्धसंयुक्तं
चारुहासं चतुर्भुजम्,
बर्हिपिञ्छावचूडाङ्गं  कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥४

उत्फुल्लपद्मपत्राक्षं
नीलजीमूतसन्निभम्,
यादवानां शिरोरत्नं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥५

रुक्मिणीकेळिसंयुक्तं
पीतांबरसुशोभितम्,
अवाप्ततुलसीगन्धं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥६

गोपिकानां
कुचद्वन्द्व कुंकुमाङ्कितवक्षसम्,
श्री निकेतं महेष्वासं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥७

श्रीवत्साङ्कं
महोरस्कं वनमालाविराजितम्,
शङ्खचक्रधरं देवं कृष्णं वंदे जगद्गुरुम् ॥८

कृष्णाष्टकमिदं
पुण्यं प्रातरुत्थाय यः पठेत्,
कोटिजन्मकृतं पापं स्मरणेन विनष्यति ॥९





 

Sunday, 7 August 2016

मैत्र जीवांचे..|


मैत्रीचे रुप प्रत्येकाच्या मनात असते आपले आपले खास.. मैत्री म्हटलं की आठवतं.. डोळ्यांपुढे उभे राहणारे, जीवाला जीव देणारे, मदत करूनही नेहमी मागे राहणारे सोबती..मित्र काय किंवा मैत्रिण काय..जगण्याचे खरे सौंदर्य हे मैत्रीत आहे..
मैत्री..! कुणाला ती गवसते पुस्तकांच्या पानांत..तर कुणाला ह्या नात्याची हाक ऐकु येते निसर्गात..कुणाला ते भेटतं एखादया कलेत.. तर कुणाशी त्याची गट्टी होते मानवेतर सृष्टीत..
कुणासाठी ते काव्य आहे...
कुणासाठी ती कल्पकता आहे...
कुणासाठी ते चातुर्य आहे...
कुणासाठी ते हास्य आहे...
कुणासाठी तो उपदेश आहे.. परंतु कोवळ्या अश्या अंत:करणात शांतपणे डोकावून पाहिलं ना की जाणवतं..''जीवनाला परीपूर्ण करणारी आपल्याच संस्कारांनी घडविलेली ही उत्कृष्ट चमत्कृती आहे..."






"...सावधपण । सर्व विषयी ।।"


"पहिले ते हरिकथा निरुपण  दुसरे ते राजकारण 
तिसरे ते सावधपण  सर्व विषयी "

नुकतेच शिवथरघळ-मंगलगड हा प्रवास करत असताना इतिहास-दुर्गप्रेमी श्री संतोष मोरे यांजकडुन शिवकालीन ऐतिहासिक पुलाची माहीती मिळाली.. तसेच आज लोकसत्ताने देखील ह्या पुलाची दखल घेतली आहे..

पार गावचा शिवकालीन पूल

 



महाडजवळील अपघाताबरोबरच आमच्याकडील जुने पूल एकदम चर्चेत आले. त्या चर्चेचा रोख शे-दीडशे वर्षे पाठीमागे ब्रिटिशांपर्यंत पोहोचतो. पण सातारा जिल्हय़ातील प्रतापगडाच्या परिसरात शिवरायांनी बांधलेला एक पूल अद्याप ठणठणीतच नाहीतर तो वाहतादेखील आहे. महाबळेश्वरच्या डोंगरातून जावळीच्या खोऱ्यातील पार या गावाला खेटूनच कोकणात एक वाट उतरायची. तो पार घाट. इतिहासकाळी वर्दळीच्या असलेल्या या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठीच शिवरायांनी प्रतापगड बांधला. या वाटेला पार गावाच्या अलीकडेच कोयना नदी आडवी येते. शिवरायांनी या जागीच कोयनेवर हा पूल बांधला. दगडी चिऱ्यांमध्ये बांधलेला चार कमानींचा हा पूल १६ मीटर लांब आणि मीटर रुंद आहे. याच्या खांबांना कोयना नदीच्या उगमाच्या बाजूस मत्स्य आकारात निमुळते रूप देण्यात आले आहे. जेणेकरून ऐन पावसाळय़ातही पुराच्या पाण्याची धार उत्तमरीत्या कापली जाते. या पुलाच्या बांधकामाच्या प्रारंभी स्थापना केलेली गणेशाची मूर्तीही इथे दिसते.
आज या सेतूनिर्माणाला तब्बल साडेतीनशे वर्षे होऊन गेली आहेत, पण आजही हे सारे स्थापत्य ठणठणीत आहे. जावळीच्या खोऱ्यातील आठ-दहा गावांचे दळणवळण आजही या पुलावरूनच सुरू आहे. अगदी छोटय़ा वाहनांपासून ते एसटी बस, जड वाहनांपर्यंत. अनेक संशोधक, अभ्यासक हा पूल पाहण्यासाठी वाट वाकडी करत या पार गावात येतात. ही निर्मिती पाहून थक्क होतात..
०७/०८/२०१६