वसंत पुरुषोत्तम काळे.
निराळ्या पद्धतीने लिहिणारा शब्दांचा जादूगार !
निराळ्या पद्धतीने लिहिणारा शब्दांचा जादूगार !
कादंबरी,नाटके,आत्मवृत्तपर,चरित्रात्मक लेखन जरी ह्यांनी केले असले तरी त्याही पेक्षा सरस ते कथाकथनकार म्हणून भावतात.
गोष्ट
सांगणं ही एक अद्भुत कला आहे, हल्लीच्या पिढीत प्रकर्षाने हरवत जाणारी ही
कला पुन्हा शिकायची असेल तर वपुंना ऐकल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही
वयातील व्यक्तीला सहज खिळवुन ठेवणारी त्यांची शैली काही औरच.. ती मजा
सांगण्यात नाही ऐकण्यातच आहे. शब्दसामर्थ,उपमा,अंतःकरणास भिडणारे शब्द,
प्रसंग विस्तृतपणे मांडण्याचे अनोखे भाषासौंदर्य त्यांच्या लिखाणात आढळते.
सामान्यांना 'असामान्य' करण्याची सहजता त्यांच्या लेखणीत आहे. वपुंची प्रकाशित साहित्य संपदाही खूप आहे. त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायला हरकत नाही.
कुठलीही तुलना नाही पण गंमत म्हणून सांगायचं झालं तर व पु काळे आणि William Sydney Porter (O.Henry) ह्यांच्या कथा लिहिण्याच्या शैलीत थोडे साम्य आढळते.
सामान्यांना 'असामान्य' करण्याची सहजता त्यांच्या लेखणीत आहे. वपुंची प्रकाशित साहित्य संपदाही खूप आहे. त्याचा मनसोक्त आस्वाद घ्यायला हरकत नाही.
कुठलीही तुलना नाही पण गंमत म्हणून सांगायचं झालं तर व पु काळे आणि William Sydney Porter (O.Henry) ह्यांच्या कथा लिहिण्याच्या शैलीत थोडे साम्य आढळते.
त्यांची काही वाक्य -
एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात.. "हा पेला त्या आकाशाचे नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी, कायम रिताच राहावा.असा मला आशीर्वाद द्या!"
"'जगायचं' - आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं - म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नंही हवीत.
केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला, तरी तो हवा, त्याच्या आठवणीही हव्यात.
भोगून पार केलेली संकटं आणि यातना, त्यांच्या उच्चाराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात.
त्याची नशा माणसाला गस्त बनवते, मस्तवाल बनवत नाही..."
"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका."
माणूस निराळा वागतोय, बिघडला - कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो.
पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो."
'सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.असा एखादा अनुभव.'"
माझं वैयक्तिक आयुष्य माझ्या साहित्यापासून लांब नाही म्हणूनच मला 'वाङमयीन अलिप्तता' साधलेली नाही हे मला जाणवतं,
पण त्याच वेळेला माझ्यातल्या लेखकाच्या आणि माणसाच्या संवेदना एकंच आहेत ह्याचा मला अभिमान वाटतो."
"माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत.
जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.
आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही.
एकमेकांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणाला तरी समजावं असं वाटतं. असं का?''
एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात.. "हा पेला त्या आकाशाचे नित्यनूतन दान स्वीकारण्यासाठी, कायम रिताच राहावा.असा मला आशीर्वाद द्या!"
"'जगायचं' - आणि तेही जनावरापेक्षा वेगळं जगायचं - म्हटलं की भूतकाळही हवा आणि स्वप्नंही हवीत.
केवळ कटू आठवणींनीच भूतकाळ भरलेला असला, तरी तो हवा, त्याच्या आठवणीही हव्यात.
भोगून पार केलेली संकटं आणि यातना, त्यांच्या उच्चाराबरोबरच वेगळं सामर्थ्य देतात.
त्याची नशा माणसाला गस्त बनवते, मस्तवाल बनवत नाही..."
"आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच. मूर्ती असतेच. दगडाचा फक्त नको असलेला भाग काढून टाकायचा असतो. मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा. फेकून द्यायच्या भागाकडे नको. आणि ह्याच भावनेने निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पाहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणि शेवटी माणूस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका."
माणूस निराळा वागतोय, बिघडला - कामातून गेला, असं आपण पटकन एखाद्याबद्दल बोलतो.
पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो."
'सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.असा एखादा अनुभव.'"
माझं वैयक्तिक आयुष्य माझ्या साहित्यापासून लांब नाही म्हणूनच मला 'वाङमयीन अलिप्तता' साधलेली नाही हे मला जाणवतं,
पण त्याच वेळेला माझ्यातल्या लेखकाच्या आणि माणसाच्या संवेदना एकंच आहेत ह्याचा मला अभिमान वाटतो."
"माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो. त्याला म्हणूनच हवी असते एक सोबत.
जिला मनातली सगळी स्पंदनं समजतील, आकांत कळेल, आक्रोश उमगेल, महत्वाकांक्षा पेलेल अशी हवी असते.
आयुष्यातली ही मोठी गरज नियतीने भागवल्यावर माणसाचं समाधान व्हायला हवं. पण नाही.
एकमेकांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम आहे, हे आणखीन कुणाला तरी समजावं असं वाटतं. असं का?''
"नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही.
वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव
जोडायचे असतात.
म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं.
करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची
घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.
'साहित्य हे केवळ चुन्यासारखं असतं.'
त्यात आपल्या विचारांचा कात
टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ
रंगत नाही.
आणि लेखकाला हवा असतो तो संवाद.
त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही."
वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव
जोडायचे असतात.
म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरतं चिरंजीव होतं.
करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची
घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.
'साहित्य हे केवळ चुन्यासारखं असतं.'
त्यात आपल्या विचारांचा कात
टाकल्याशिवाय आपल्या आयुष्याचा ग्रंथ
रंगत नाही.
आणि लेखकाला हवा असतो तो संवाद.
त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही."
जीवनात घडणारे प्रसंग तितक्याच ताकदीने मांडणा-या ह्या लेखकाला जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन !