गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची?
काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.
पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे?
माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
कालपुरुषा तु स्वत: थकशील,
थेरडा होशील पण,
आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.
आम्ही लढतच राहु.
हे आव्हान घे माझे
-एका कलाकाराचे!
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
हस्ति सर्व संपदा,
मस्तकात शारदा
असे असून दिनसा,
झुरसी काय व्यर्थ तू,
माणसा समर्थ तू!
पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या
प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा,
हेच तत्त्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची
आता नुरे यातिगोत, धर्म एक भागवत
मोक्षमार्गाची माऊली, चंद्रभागा संतोषली
तीर्थी नाहताती संगे, शुद्ध-मळीणांची अंगे
साने समत्व बाहिले, श्रेष्ठ सानपणा ल्याले
पळून गेलेल्या काळाच्या कानात
माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे
"नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां ? अवघ्या आशा श्रीरामार्पण"
गीत हवे का गीत?
एका मोलें विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत
गिऱ्हाईकाच्या लहरीखातर
कातुनि मी आणियले अक्षर
सुरेख केल्या बघा बाहुल्या वरी बांधिली फीत..
नजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा
नित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा!
पु.लं.म्हणतात,"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत. माणसाच्या मनाचे लहान मोठेपण, राग-द्वेष घालवून टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते. हजारो माणसे एक गाणे जेंव्हा आनंदाने गातात, त्या वेळेला त्या हजारांचे अंत:करण एक होते. माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली. म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार (Madgulkar Boys) आहोत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. "एका तळ्यात होती" (चित्रपट - सुखाचे सोबती) आणि "सैनिक हो तुमच्यासाठी" (चित्रपट - पाहू रे किती वाट) ही गाणी ऐकून डोळा पाणी न आलेला त्यावेळचा रसिक शोधूनच काढावा लागेल. ही दोन्ही गाणी ऐकताना माझ्या डोळ्यात तर आजही पाणी येते.
कुसुमाग्रज म्हणतात,"माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली, अस्सल मराठी स्वरुपाची, कलंदर शैलीची आणि कसदार आशयाची आहे. शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते." तर पु भा भावे म्हणतात, "वास्तवतेतील गूढत्व आणि साधुत्व पहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते. माडगूळकरांच्यापाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे. ते नुसते आकाशाकडे पाहत नाहीत, तर आकाशतत्त्वाकडे पाहतात. ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले."
लेखक पु.भा.भावे,
''वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.''
कविवर्य बा.भ.बोरकर,''आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.''
यशवंतराव चव्हाण
''गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.''
लघुकथा
१) लपलेले ओघ
२) बांधावरल्या बाभळी
३) कृष्णाची करंगळी
४) बोलका शंख
५) वेग आणि इतर कथा
६) थोरली पाती
७) तुपाचा नंदादीप
८) चंदनी उदबत्ती
९) भाताचे फूल
१०) सोने आणि माती
११) तीन चित्रकथा
१२) कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवासवर्णन)
१३) तीळ आणि तांदूळ
१४) वाटेवरल्या सावल्या
१५) मंतरलेले दिवस (राज्य पुरस्कार)
१६) तीन चित्र-कथा
काव्यसंग्रह
१) सुगंधी वीणा
२) जोगिया (राज्य पुरस्कार)
३) काव्यकथा
४) चार संगितिका
५) चैत्रबन (राज्य पुरस्कार)
६) गीतरामायण (इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराती, सिंधी, बंगाली, कानडी, तेलगू, कोकणी, ब्रेल भाषांतरित)
७) गीतगोपाल
८) दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार)
९) गीतसौभद्र
१०) पूरिया
११) वैशाखी
१२) अजून गदिमा
बालवाङमय
१) दे टाळी ग घे टाळी (केंद्र पुरस्कार)
२) ऊभे धागे आडवे धागे
३) शशांक मंजिरी
४) नाच रे मोरा
कादंबरी
१) आकाशाची फळे
२) ऊभे धागे आडवे धागे
संकीर्ण
१) तुलसी रामायण (गद्य भाषांतर)
२) गदिमा नवनीत (वेचे)
नाटक
१) युध्दाच्या सावल्या
संपादित मासिके
१) शब्दरंजन
२) अक्षर
३) धरती
आवर्जून वाचावीत अशी गदिमांवरील पूस्तके
१) आकाशाशी जडले नाते : विद्याताई माडगूळकर
२) मंतरलेल्या आठवणी : श्रीधर माडगूळकर
३) आठवणीतील अण्णा - गदिमा : राजा मंगळवेढेकर
४) गदिमांच्या सहवासात : म.गो.पाठक
www.gadima.com
काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.
पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे?
माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
कालपुरुषा तु स्वत: थकशील,
थेरडा होशील पण,
आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.
आम्ही लढतच राहु.
हे आव्हान घे माझे
-एका कलाकाराचे!
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
हस्ति सर्व संपदा,
मस्तकात शारदा
असे असून दिनसा,
झुरसी काय व्यर्थ तू,
माणसा समर्थ तू!
पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या
या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या
प्रजा रंजवितो सौख्ये तोच एक राजा,
हेच तत्त्व मजसी सांगे राजधर्म माझा
प्रजा हीच कोटी रूपे मला ईश्वराची
आता नुरे यातिगोत, धर्म एक भागवत
मोक्षमार्गाची माऊली, चंद्रभागा संतोषली
तीर्थी नाहताती संगे, शुद्ध-मळीणांची अंगे
साने समत्व बाहिले, श्रेष्ठ सानपणा ल्याले
पळून गेलेल्या काळाच्या कानात
माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे
"नच स्वीकारा धना कांचना,नको दान रे, नको दक्षिणा
काय धनाचें मूल्य मुनिजनां ? अवघ्या आशा श्रीरामार्पण"
गीत हवे का गीत?
एका मोलें विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत
गिऱ्हाईकाच्या लहरीखातर
कातुनि मी आणियले अक्षर
सुरेख केल्या बघा बाहुल्या वरी बांधिली फीत..
नजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा
नित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा!
पु.लं.म्हणतात,"महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत. माणसाच्या मनाचे लहान मोठेपण, राग-द्वेष घालवून टाकण्याचे गाण्याइतके दुसऱ्या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते. हजारो माणसे एक गाणे जेंव्हा आनंदाने गातात, त्या वेळेला त्या हजारांचे अंत:करण एक होते. माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली. म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार (Madgulkar Boys) आहोत, हे सांगायला मला अभिमान वाटतो. "एका तळ्यात होती" (चित्रपट - सुखाचे सोबती) आणि "सैनिक हो तुमच्यासाठी" (चित्रपट - पाहू रे किती वाट) ही गाणी ऐकून डोळा पाणी न आलेला त्यावेळचा रसिक शोधूनच काढावा लागेल. ही दोन्ही गाणी ऐकताना माझ्या डोळ्यात तर आजही पाणी येते.
कुसुमाग्रज म्हणतात,"माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली, अस्सल मराठी स्वरुपाची, कलंदर शैलीची आणि कसदार आशयाची आहे. शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते." तर पु भा भावे म्हणतात, "वास्तवतेतील गूढत्व आणि साधुत्व पहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते. माडगूळकरांच्यापाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे. ते नुसते आकाशाकडे पाहत नाहीत, तर आकाशतत्त्वाकडे पाहतात. ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले."
लेखक पु.भा.भावे,
''वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.''
कविवर्य बा.भ.बोरकर,''आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.''
यशवंतराव चव्हाण
''गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.''
लघुकथा
१) लपलेले ओघ
२) बांधावरल्या बाभळी
३) कृष्णाची करंगळी
४) बोलका शंख
५) वेग आणि इतर कथा
६) थोरली पाती
७) तुपाचा नंदादीप
८) चंदनी उदबत्ती
९) भाताचे फूल
१०) सोने आणि माती
११) तीन चित्रकथा
१२) कलावंताचे आनंद पर्यटन (प्रवासवर्णन)
१३) तीळ आणि तांदूळ
१४) वाटेवरल्या सावल्या
१५) मंतरलेले दिवस (राज्य पुरस्कार)
१६) तीन चित्र-कथा
काव्यसंग्रह
१) सुगंधी वीणा
२) जोगिया (राज्य पुरस्कार)
३) काव्यकथा
४) चार संगितिका
५) चैत्रबन (राज्य पुरस्कार)
६) गीतरामायण (इंग्रजी, संस्कृत, हिंदी, गुजराती, सिंधी, बंगाली, कानडी, तेलगू, कोकणी, ब्रेल भाषांतरित)
७) गीतगोपाल
८) दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार)
९) गीतसौभद्र
१०) पूरिया
११) वैशाखी
१२) अजून गदिमा
बालवाङमय
१) दे टाळी ग घे टाळी (केंद्र पुरस्कार)
२) ऊभे धागे आडवे धागे
३) शशांक मंजिरी
४) नाच रे मोरा
कादंबरी
१) आकाशाची फळे
२) ऊभे धागे आडवे धागे
संकीर्ण
१) तुलसी रामायण (गद्य भाषांतर)
२) गदिमा नवनीत (वेचे)
नाटक
१) युध्दाच्या सावल्या
संपादित मासिके
१) शब्दरंजन
२) अक्षर
३) धरती
आवर्जून वाचावीत अशी गदिमांवरील पूस्तके
१) आकाशाशी जडले नाते : विद्याताई माडगूळकर
२) मंतरलेल्या आठवणी : श्रीधर माडगूळकर
३) आठवणीतील अण्णा - गदिमा : राजा मंगळवेढेकर
४) गदिमांच्या सहवासात : म.गो.पाठक
www.gadima.com
No comments:
Post a Comment