स्वराज्यातील मावळे उभे करण्यासाठी रामदास स्वामींनी उभारलेल्या हनुमान मंदीर आणि
व्यायामशाळा यांचा मोलाचा वाटा होताच... बिकट प्रसंगी अफजल खानाच्या आगमनाची चाहुल देणारे हे रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांस पाठवलेले हे 'गुप्तपत्र'..
" विवेंके करावे कार्यसाधन
जाणार नरतनु हे जाणोन..
पुढील भविष्यार्थी मन
रहाटोच नये !!
चालो नये असन्मार्गी
सत्यता बाणल्या अंगी..
रघुवीर कृपा प्रसंगी
दास महात्म्य वाढवी !!
रजनीनाथ आणि दिनकर
नित्यनेमे करिती संचार..
घालिताती येर झार
लाविले भ्रमण जगदिशे !!
आदिमाया मूळ भवानि
हेचि जगाची स्वामिनी..
एकांती विवंचना करोनी,
इष्ट योजना करावी !! "
प्रत्येक चरणातील 'आद्याक्षर' वाचल्यास ह्यातील प्रसंगावधानता दिसून येईल.
No comments:
Post a Comment