Sunday, 22 November 2015

कितीसं लागतं... !!




दिवसरात्र पैशांसाठी धावत असताना..
निरागस अश्या आजुबाजूच्या आणि आत दडलेल्या 'बालपणा'कडे पहायला…
कितीसं लागतं... !!

अनुभवांतून घडलेल्या 'त्या' मूर्तींना उपेक्षित न ठेवता..
सहजचं.. बरं आहे ना.. ? विचारायला...
कितीसं लागतं... !!

फुकट तिकडे प्रकट होण्यापेक्षा..
पुरेसं पण 'समाधान'पूर्वक मिळवण्यासाठी..
कितीसं लागतं... !!

तक्रार तर सर्वच करतात..
पण तरीही 'दु:खाची झळ','आनंदाचे क्षण'
या आपल्या संमिश्र प्रसंगात,
नेहमीच साथीदार असणाऱ्या 'प्रवास'रमणीला
'Thank You' म्हणायला..
कितीसं लागतं... !!

Ownership चा भाग सोडता..
Global Culture ची चर्चा सोडता..
जन्म-मरणाच्या चक्रात नवनिर्मितीचा आनंद घेणाऱ्या..
'त्या' कळीला फुलू देऊन जगू देण्यास..
कितीसं लागतं... !!

कुणीतरी जिंकणारच..! कुणीतरी हरणारच..!
जीवनातील ह्या स्पर्धेत कुणीतरी मागे-पुढे राहणारच..
तरीही दुस-याच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी कधीतरी मुद्दाम हरण्यास..
यशापयशाची चर्चा न करता.. सहज 'खिलाडू'वृत्तीने खेळण्यास.. 
कितीसं लागतं... !!

टपरीवरचा चहा.. रात्रीचं चांदणं..
मातीचा स्पर्श.. पावसात भिजण्याची मजा..
आणि बरंच काही..!
'दुस-यातील गुणांचं' मोकळेपणाने Appreciation करायला..
कितीसं लागतं... !!

कधीतरी Surprise द्यायला.. हमखास 'वेळे'आधी पोहोचायला..
कुणालातरी न सांगता Call करायला..
 आणि बरंच काही..!
शाळेतील मज्जा पुन्हा एक दिवस अनुभवायला..
कितीसं लागतं... !!

भाषेचा गोडवा गायला.. मनाची संवेदनशीलता जपायला..
कवितेला साद असो.. अभिनयाला दाद असो..
सत्य/ध्येयासाठी घातलेला वाद असो..
जगणं असं 'निर्विवाद' जगायला..
कितीसं लागतं... !!

गाण्याची तान असो.. जगण्याचे भान असो..
साक्षरतेचा दीप असो..
नाचण्यात - बागडण्यात घालवायचा क्षण असो..
वेडीवाकडी जंगलातील गडकिल्ल्यांची मोहीम असो..
आणि बरंच काही..!
असं 'मुद्दाम' वेळ काढून करायला..
कितीसं लागतं... !!

मी काय किंवा तुम्ही काय,
आपण तर सारेच 'आनंदयात्रेचे' प्रवासी आहोत..
मग कुणाच्यातरी दु:खात सहभागी व्हायला..
आनंदात सहज मागे राहायला..
कितीसं लागतं... !!

आयुष्याचं देणं तर देता देता फिटणार नाही..
'स्वत:' उजळल्याशिवाय अंधाराच 'राज्य' मिटणार नाही..
तरीही..
अपेक्षांचे ओझे न बाळगता.. मुक्तपणे.. समाधानाने..
आनंद 'देत-घेत' जगायला..
कितीसं लागतं... !!

Wednesday, 18 November 2015

'माझ्या मातीचे गायन'



'माझ्या मातीचे गायन',
तुझ्या आकाश श्रुतीनी
जरा 'कानोसा' देऊन,
कधी ऐकशील का रे ?

             माझी धुळीतील चित्रे,
             तुझ्या 'प्रकाश नेत्रांनी'
             जरा पापणी खुलून,
             कधी 'पाहशील' का रे ?

माझ्या जहाजाचे पंख,
मध्यरात्रीत माखले
'तुझ्या किना-यास' दिवा,
कधी 'लावशील' का रे ?


              माझा रांगडा अंधार,
              मेघा-मेघात साचला
              तुझ्या 'उषेच्या कानी',
              कधी 'टिपशील' का रे ?

वर्ख लाऊन कागदी
माझे 'नाचते बाहुले',
कधी 'कराया कौतुक'
खाली 'वाकशील का रे' ?
       
- कुसुमाग्रज

Wednesday, 11 November 2015

भेटतात ना ! 'व्यक्ती' ??



"नवीन कविता, जुनाच प्रश्न, जाण्या समीप उत्तरा,
केला छोटासा यत्न ?"


प्रत्येकाची सहज 'गती',
अन् सहज 'विचरते' मती,
भेटतात ना ! 'व्यक्ती',
वा नुसतेच 'हेतू' किती ??

जाती विद्यालयी 'उत्तरे', केवळ प्रश्नपत्र 'सोडवण्या',
चढती शिवालयी उंची अत्तरे, नवसाच्या 'बोलण्या',
'जडते' रीत पसा-याची, ठेऊन 'ज्ञाती' नजरेपुढती,
'पडते' प्रीत जीवांची सम त्या, अडता 'status' वरती..

बरसतो 'मल्हार' मनावर, सूर- ताल भेटता,
अन् उठते 'काहुर' उगाच मनी, नुसता डोळा लवतां,
चढती सरसर 'दहा' पाऊले होऊन 'वा-यापुढती',
चालती अलगद 'चार' पाऊले, कुठे 'चांदण्याराती'...

'निर्हेतुक' हा प्रश्न विचारी,
तुम्हांस नसावी भीती,
अनुत्तरित या प्रश्नावरती...
काळाच्या पडताहेत "फिती" !

पडू नको ! 'कसातरी'


पावसाच्या 'अनियमित' वेळापत्रकामुळे, 'चुकणा-या' नियमित भेटींना कंटाळून 
पावसाला 'सुनावणारा' कवी...

पडू नको ! 'कसातरी' सकाळ - संध्याकाळी
हवा तसा नाचून घे! तू शेष 'मध्यान्हकाळी'

हि आहे निर्भीड लाघवी अन 'लाजाळू मनाची'
मला नाही एक सवय उगा 'कनवाळूपणाची'
तुम्ही ज्ञानी भाऊराया, समजा अडचण भगिनीची,
तू 'असता' तिथे तिने कशी छत्री 'मिटायची' ?

पाते लवते न तोच सारे आभाळ भरते,
तुझ्या 'तिच्या' प्रेमा कशी मग भरती जडते,
'तू येता' हिच्या डोईवर 'छत्री' उभारते
'धार मुसळ' असूनही मनी 'ओहोटी' लागते

तुझ्या 'अवेळी येण्याने' हि तिचा थाटच हरते,
तुझ्या 'अवेळी जाण्याने' जनलाट धडकते !
होऊन लाटेवर स्वार मन 'स्वजन' शोधते,
हलक्या थेंबांच्या पुढती मन मणाने भरते !! 

पावसाला आवतान...


सरल्यावर पाचांनंतर त्या, आहे 'खास' मास 'जून',
काळ्या पांढ-या गर्द ढगांच्या, 'पाठशिवीचा खेळ' रुजून,
सृष्टीच्या घटकांतील संयम, चालला आहे निजून,
सगळीकडे एकच चर्चा, "हा पडत का नाही अजून"? 

'ऊन कोवळे' म्हणता म्हणता, चांगलेच गेले आहे 'माजून',
हरित तृणासह मृगपृष्ठेही, काढलीत त्याने 'भाजून',
सोड तुझे तू 'मौन', आमुच्या 'प्रार्थना'ही गेल्यात थिजून,
दे ना ! थेंब तुझ्या 'स्पर्शा'चा,
बहरून येईल पुन्हा रुजून

घेऊन बसलो आहे कराया, रचना तुजवरी अंदाजून,
कागदासवे 'पर्व नवे', पण शब्दच पडले आहेत 'जून'
पुन्हा लिहुयात बालभावगीतं, नकोच त्या 'वैरण्या' अजून
"पाठव माझ्यासाठी तीजसवे, 'शब्दांची घागर' आवर्जून" 

AC च्या पाण्याने गेलेत, पत्रेही सारे भिजून,
बंद करून दरवाजे खिडक्या, भावनाही जातील कोमेजून,
मुक्तपणे करण्या विहार, मज खोलू देत दरवाजे अजून,
येशील ना आतातरी लवकर, "का वाट पहावी आम्ही अजून" ?  


नविन रेखाटन....


ह्याला करतो फोन, कधी त्याला करतो फोन, ☎
सदा कानी पडतो माझ्या, एकच 'बिझी टोन' !
करत असाल बहुदा, तुम्हीही मला फोन,
"मित्र बदललेत वाटतं" असा उगा मम दृष्टीकोन !!

तुंग तुंग शिखरांवर, सर व्हावी एक करारी,
ढगां सवे बरसून, फुलावी दुनिया  सारी !
शांत बसून राहण्याशी, अवगत नाही मज यारी,
लोका उगा वाटे माझी काम लय भारी !!

आठवड्यापरत्वे जमतोय, कवितेचा हा GAME,
चुकवू नये वाटे, असा एक नेम !
भय नसे मज कुठलेही, हा प्रवास सुंदर क्षेम,
कारण तुम्ही एक आहात "खडा around my GEM" !!

Weekend च्या काही रेघोट्या....



इतक्या गरम वातावरणातही, रोज Warm Up करावा लागतो,
मात्र याचसाठी आपला आवडता, 'गरम चहा' सोडावा लागतो;
Important या गोष्टीसाठी, 'डंब-एल्स' वापरावा लागतो,
40 kg वजनी 'TITANIC पोझ'ला FLY म्हणावा लागतो !!

भावाधाराने उभे राहताना " I'm falling with..." म्हणतात,
आणि अधिरतेने Dr.कडे जाणा-याला PATIENT म्हणून संबोधतात;
जवळचे असणारे सारे, मात्र गप्प राहतात,
आणि दूरवरचे "I'm always with U" send करतात !!

अशा विचित्र विनोदाच्या साथीने, कवितेशी मी 'खेळ' करतो,
जमलाच तर 'मेळ', नाहीतर 'खेळखंडोबा' ठरतो;
पाठवलेल्या रचनेविषयी वाचक 'ठेंगा दाखवून' वर्दी देतो
मग अशा वेळी मला "दाद न देणाराच" खरा दर्दी वाटतो !!

छे ! असं काही नाही....



" I'm using WhatsApp" वाले use करतात असे नाही,
"Busy" लिहून ठेवणारे 'कष्टाळू' असतात असे नाही,
Status मधून 'प्रगटतात सारे भाव मनीचे' खरं नाही,
सगळयांसाठीच हेच परिमाण लावणेही बरोबर नाही !

असते 'एकच' नाव Userचे म्हणती सारे खरं नाही
नसते सय नावांची त्या खास यां सारखे असत्य नाही
सुंदर से ते 'रूपक' देण्यासम महत्तम दुसरे कृत्य नाही
'नावं ठेवणं असभ्य आहे' म्हणण्यात आता तथ्य नाही !

'सवड मिळता संदेश पाठवतो' हि कुणाची सवय नाही,
रोज मेसैज करणारा 'कर्मकांडी' आहे असेही नाही !
'Last seen' Hide करतो, म्हणून 'जागतो' असे नाही,
hide करत नाही म्हणजे, लवकर 'झोपतो' असेही नाही !!

Chatting फांदीवरून 'वकावका बोलणारे', काही कावळे नाहीत,
आणि 'नुसतेच msg  वाचणारे' सगळेच काही  बगळे नाहीत !
copy - paste करणारे Data Operator यांहून वेगळे नाहीत !!

प्रवासास हे शब्दच निघती, माझ्याशी हा 'दुरावा' नाही,
पथिकांची तृषा शमविणारे, ते फक्त ओहोळ नाहीत, 
प्रतिबिंब असते तुमचेही त्यात,  या आरशा कधी पडदा नाही, 
वाचतात कविता सगळी, हि माझी "अंधश्रद्धा नाही"... 

स्वप्नं ..


कधी अचानक, कधी अनामिक भेट ही ठरलेली..
रात्रीच्या त्या निरव शांततेत निद्रा ही उडालेली..
ओघवत्या गप्पांच्या त्या नादात रात्र ही सरलेली..
पुन्हा होईलच भेट ही भीतीयुक्त आस मनी उरलेली..
मौनातील संवादांचे अर्थ लावता लावता झोपु शकलो नाही..
इतके होते का तुझे माझ्यावर प्रेम हे मात्र ओळखू शकलो नाही..
लपवलेल्या त्या मनात भावनेलाच स्थान आहे
वाटतं नसलं 'खरं' तरी सुख:- दु:ख , राग द्वेषाला मात्र मान आहे
''स्वप्नांची आहे सोबत म्हणून वास्तविकतेला 'अर्थ' आहे..
जर स्वप्नच पडली नाहीत तर झोप सुद्धा 'व्यर्थ' आहे !''


आपण...देतच हो जायचे



'जमती भूते जिथे शीssते असती'
कलियुगाची सहज रीत ती !
विशुद्धतेने भूतांनाही माणसाळवयाचे,
आनंदाने आपण त्यांना देतच हो जायचे !!

दोष सांगति सातत्याने,
खास असे ते अपुल्या कारणे !!
हितचिंतकांचे बि-हाड अपुल्या बाजूस थाटायचे, 
सगुणतेने धन्यवाद त्या देतच जायचे !!

मूर्त्या सदोदित मनमंदिरी त्या,
सगुणते वा निर्गुणतेने !!
प्रगट ता  पुढती आपण त्यांचे दर्शन ते घ्यायचे,
आत्मियतेने  अभिवादन देतच हो जायचे !!

शब्दांच्या या नावेवर कुणी,
वर्षावे किंवा बरसावे !!
भावसागरी जमून येती फेन तरंगांचे.
आपण शांतपणाने वल्हे, देतच हो जायचे !!

" मी फक्त हसतो "




ब-याचदा आता वयस्थ भेटायला येतात,
माझ्या वयाप्रमाने ते प्रश्न विचारू लागतात,
स्वत:च्या उत्तरपत्रीका वाचून दाखवू लागतात,
आनि मध्येच मग स्वत:च पर्यायी प्रश्न दाखवू लागतात..
तेव्हा मी पुस्तकात तोंड खुपसून बसत नाही...
" मी फक्त हसतो "

नेहमी वेल येते मित्रांसोबत बसायची,
गप्पांच्या आडून आपले प्रश्न सोडवायची,
वेल बघून झाडतो मी फैरी माझ्या प्रश्नांची,
मग सुरू होते तिथेही Tape...व्रुत्तपत्र..TV channel वाल्यांची,
तेव्हा मीss Remote फेकून देत नाही...
मीss " मी फक्त हसतो "

कधी कधी स्वप्नं ही येतात भेटायला.,
रात्रच्या रात्र जागवायला....
बसतो मग गप्पा मारायला....
तेही लागते अधिरतेने झुलायला.....
मग मी ही लागतो इस्पिकचा राजा उतरायला....
'ते' सहजच म्हणते 'माझ्या फक्त मित्रा' अरे वेल आहे अजुन बदामची रानी यायला....
तेव्हा " मी फक्त हसतो "

हल्ली ब-याचदा माझा 'कवि'पक्ष जाग्रुत होतो...
माझ्या लांबलचक गहन बोलना-या 'लोकमता' विरोधात शड्डू ठोकतो...
तेव्हा मी 'विक' न होता सरल ही 'केस' तुमच्या कोर्टात टाकतो....
आनि....आनि मी...
" मी फक्त हसतो "

...

 'लहान आहेस' समजवणारे आता 'वाढणारे वय' दाखवू लागलेत
आडुन आडून आता 'एकच विषय' ताडू लागलेत
समाजापासून जपणा-या मनाला, लोकांची भीती दाखवू लागलेत
कळत नाही 'मी खरं ऐकू लागलोय' कि आता 'ते खोटं बोलू लागलेत' ?

गप्पांच्या फैरी झाडणारे, तलवार म्यान करू लागलेत
status मधून सारे आपले निशाण फडकवू लागलेत
थोडं जाणवू लागलंय म्हटल -
मला 'बाळ' ठेवून सारे 'राज' होऊ लागलेत !

भावाचे निर्मळ पाणी सुद्धा बुद्धीने गाळू लागलेत
कट्ट्यावरती बोलणारे आता शब्दमर्यादा पाळू लागलेत
कोण एकेकाळी 'मनकवडा ' म्हणणारे आता 'बोलघेवडा' म्हणून संबोधू लागलेत
समजणं जरा कठिण झालंय, 'मी बिघडू लागलोय' कि काळानुरूप 'ते बी घडू लागलेत' ? 

'रुसु'रुसलेल्या मनाने आता नवीन खेळ 'सुरु' केलेतं
'राम-राम' म्हणणारे आता ते 'मरा-मरा' म्हणू लागलेयं
होता ज्यावर 'ताबा' तेही 'बाता' मारू लागलयं
'फुलपाखराचं' उलटं  आता 'सुरवंट' होऊ लागलयं!

जरी येतो करता मनानेच धावा

आपणं नेहमी विचारांचे इमले रचित असतो.
मात्र अनेक स्वप्नापेक्षा एखादी अनुभूती पुरेशी असते. अशा आशयाची रचना….

"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"

'जपाच्या  तपे निघशि तू , नित्य गावा
तरी वाटतो, अंतराचा दुरावा
मना - बुद्धीचा पूल जोडूनि देता
असे वाटते भक्त तो हि नुरावा '

"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"

'मनी जाणता ही तरी तोल जावा
रंगी रंगलेला गुजे तोच पावा,
धरी बोट कोणी,  असा हि च कावा
सदाS वाटते कि निघावे त्या गावाSS'

"जरी येतो करता मनानेच धावा
तरी एक तो स्पर्श देई पुरावा"

' म्हणे पाहिले मी किती पावसाळे
तरी एक बैसोन उगा आसू ढाळे
सरी मस्तकी असती त्या अमृताच्या
जलाचक्री हा खेळ तुजला कळावा ? '

जरी येतो करता मनानेच धावाS
तरी एक तो स्पर्श देई पुरावाSS

...बोलू काही...


" वादातीत ही नसते काही वादांमधले
सांधुनि बघ तू माझ्यासाठी 'संवाद' काही "

" किती किती हे वयस्थपणाचे मिरविशी टेंभे
विशी तल्या बालकात जाऊन बघ ना काही  "

"सदा न कदा शहाण्या सम आपण वागायाचे
वागून वेड्यागत तू केव्हा बघ ना काही "

" चौरसातल्या जगतामध्ये आता रस नाही
पल्याड हमरस्त्यावर सरसर चालू काही "

" नको नको ते हवेसारखे बोलून गेलो
हवे हवे तर नको लिहू तू म्हणना काही "

नसतंच एSSवढ अंतर...




नसतंच एSSवढ अंतर, कवितेच्या ओळीमधलं,
अर्थांच असतं भांडार, त्या अंतरात दडलेलं

नसतेच कधीही मैफिल, 'रागावर' आधारलेली,
बसतेच चाल कवितेला, 'प्रेमाने' ओथंबलेली

तबल्याचा नसतो आकार तरी , यावा तो सदा 'समताल ',
भर भरून येऊ देत ताना, न जाता 'निषादा' पल्याड.

थोडसं वेगळं…


सभोवताली पसरलेले आकाश…
'त्या'च्या छत्रछायेखाली जपलेले आपले जीवन एक 'विलक्षण' अनुभव आहे.
ज्याप्रमाणे दिवसभर केलेले 'प्रयत्न' जितके अनिवार्य आहेत… तितकीच रात्रीची 'शांतता' सुद्धा…!
ता-याशी बोलणं ही एक 'कला' आहे… ती सर्वांनाच अवगत असेल असं काही नाही… पण शिकण्याची इच्छा असली की, 'तारे' देखील गुरु होतात.
दिवसभर केलेल्या अविरत कर्मयोगानंतर येणाऱ्या संधीप्रकाशात मनाची जेव्हा कासावीस होते की,'आपण जीवनात यशस्वी तर होऊ ना?'
तेव्हा अंधारात उज्ज्वल भविष्याकडे जाण्यासाठी ह्या तारकाच आपली सोबत करतात… आकाशातील हे मनोहर असे चित्र शांतपणे पाहत त्याचा मनमुराद आस्वाद घेणे अगदी कुणालाही सहज शक्य आहे…
मानवाला एकदा का हृदयाची विशालता कळाली की…. व्यक्तित्वे ही डोळ्यांची पारणे फेडणारी 'नक्षत्रे'च बनतात….











‎उत्सव‬..


दुस-याचे दु:खं पाहून 'मदत करणारे' बरेचं मिळतीलही,
पण दुसर्याचे सुख पाहून मनापासून 'आनंदी होणारेच' खरे 'श्रीमंत'…!!
'क्षण'भर का होईना… पण जगावेगळी भेटलेली माणसेच…
आपले 'जगणे' ख-या अर्थाने 'श्रीमंत' करतात…
आयुष्य हा 'क्षणाक्षणांचा उत्सव' आहे.. फक्त तो 'प्रत्येकाला' साजरा करता यायला हवा..
‪#‎उत्सव‬..
‪#‎नात्यांचा‬..
‪#‎भावनांचा‬..




ॐकार अनादि अनंत



ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार


सूर स्पर्श सूर श्रवण
स्वरगंधित आश्वासन
तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार


सूर साध्य स्वर साधन
सूर रूप स्वर दर्पण
स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार


सप्‍तसूर स्वर्ग सात
स्वर सांत्वन वेदनांत
सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार


गीत  - सुधीर मोघे

संगीत - सलील कुलकर्णी

स्वर - सलील कुलकर्णी



स्रोत : aathavanitligani.com